चौफेर कानोसा सामाजिक

श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे दुःखद निधन.

श्रीरामपूर | डॉ. राहुल कुलकर्णी व डॉ. रोहित कुलकर्णी यांचे वडील, तसेच शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थान समता कॉलनी, थत्ते मैदानाजवळ, श्रीरामपूर येथून निघाली. स्वर्गीय बाबासाहेब कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना तसेच तालुका पातळीवरील अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. स्व. बबनराव काळे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी शेतकरी संघटनेच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले. शेतकरी संघटना युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने संघटनेवर शोककळा पसरली असून. अतिशय दाटलेल्या अंतःकरणाने श्रीरामपूर येथील अमरधाम येथे स्वर्गीय बाबासाहेब कुलकर्णी यांना अखेरचा निरोप देण्यात आला…

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!